Nuksan Bharpai 2025 Date
Nuksan Bharpai 2025: राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसणीमुळे सरकार नुकसान भरपाई किती देणार याकडे शेतकरी आस लाऊन बसले आहेत. आही आता शेतकऱ्यांना अखेर एक दिलासादायक बातमी आली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस आणि पूर आला होता, त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याच नुकसानीची भरपाई म्हणून, राज्य सरकारने ६४ कोटी ६१ लाख रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे.
पुढे वाचा सर्व माहिती सविस्तर आणि राज्यातील व देशातील शेती संबंधी अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला माझी शेती व्हाटसप्प चॅनल लगेच जॉइन करा.
| माझी शेती ग्रुप जॉइन करा | Join Now |
पीक नुकसान भरपाई कोणाकोणाला मिळणार?

- हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील तब्बल १ लाख ५ हजार १२0 शेतकऱ्यांना या मदतीचा थेट फायदा होणार आहे.
- या अतिवृष्टीमुळे जवळपास ५५ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांहून अधिक झाले होते. यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या कोरडवाहू पिकांसह हळद, ऊस, फळपिकांचेही मोठे नुकसान झाले होते.
जो बातमी वाचा : Farmer Karjmafi: शेतकरी कर्जमाफी कधी सुरू होणार? सरकारचे ‘योग्य वेळे’चे आश्वासन!
महाराष्ट्र नुकसान भरपाई मदत?
महसूल आणि वन विभागाने १५ ऑक्टोबर रोजी शासन निर्णय (GR) काढून हा निधी वाटप करण्याची मंजुरी दिली आहे. मात्र, ही मदत जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्रासाठीच दिली जाणार आहे. Nuksan Bharpai 2025
| पिकाचा प्रकार | नुकसानीपोटी मिळणारे अनुदान (प्रति हेक्टर) |
| कोरडवाहू (जिरायती) पिके | ₹ ८,५०० |
| बागायती (ओलिताची) पिके | ₹ १७,००० |
| फळपिके (केळी, आंबा, संत्री, मोसंबी) | ₹ २२,५०० |
या निधीमुळे नुकसानीत सापडलेल्या हिंगोलीतील शेतकऱ्यांना काही प्रमाणात तरी आधार मिळेल आणि त्यांना पुढील शेतीसाठी उभारी घेता येईल, अशी अपेक्षा आहे. लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. Nuksan Bharpai 2025
ही बातमी वाचा :
